Friday, March 15, 2024

147 वर्षांचं झालं कसोटी क्रिकेट...


Happy Birthday Test Cricket: 15 मार्च हा दिवस क्रिकेटच्या इतिहासात खूप खास आहे. 147 वर्षांपूर्वी म्हणजेच 1877 मध्ये आजच्याच दिवशी कसोटी क्रिकेटची अधिकृत सुरुवात झाली होती. तेव्हा मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर (MCG) इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात जगात पहिल्यांदाच ऐतिहासिक कसोटी सामना खेळला गेला. विशेष म्हणजे त्या कसोटी सामन्यासाठी वेळेची मर्यादा नव्हती. कितीही दिवस लागले तरी दोन्ही संघांना प्रत्येकी दोन डाव खेळायचे होते. कसोटी इतिहासातील पहिला सामना 15 ते 19 मार्च दरम्यान पार पडला. पहिल्या 3 दिवसांच्या खेळानंतर चौथा दिवस म्हणजे 18 मार्च 1877 (रविवार) हा विश्रांतीचा दिवस म्हणून ठेवण्यात आला. यानंतर पाचव्या दिवशी ऑस्ट्रेलियानं 45 धावांनी विजय मिळवला होता.

बॅनरमॅननं झळकावलं क्रिकेटच्या इतिहासातलं पहिलं शतक : ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर फलंदाज चार्ल्स बॅनरमॅनसाठी तो ऐतिहासिक कसोटी सामना खूप खास ठरला. बॅनरमॅननं कसोटी क्रिकेटच्या पहिल्याच दिवशी शतक झळकावलं. इतकंच नाही तर पहिली कसोटी धावही बॅनरमॅनच्या बॅटमधूनच आली. कसोटी सामन्यातील पहिला चेंडू इंग्लंडच्या अल्फ्रेड शॉनं टाकला आणि तो चेंडू बॅनरमॅननं खेळला. त्यानंतर कांगारु फलंदाज चार्ल्स बॅनरमॅननं वैयक्तिक पन्नास धावांचा टप्पा गाठला. एवढंच नाही तर त्या अर्धशतकाचं शतकात रुपांतर करुन त्यानं इतिहास रचला. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील पहिल्या शतकाची जेव्हा चर्चा होते तेव्हा बॅनरमॅनचे नाव अग्रस्थानी असते. अखेरीस बॅनरमॅन 165 धावा करुन निवृत्त झाला. बॅनरमॅन जखमी झाला होता. त्याच्या बोटाला दुखापत झाली होती.

बॅनरमॅन नंतर मिडविंटरचा कहर : ऑस्ट्रेलियानं पहिल्या डावात 245 धावा केल्या होत्या. त्यापैकी एकट्या बॅनरमॅननं 165 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात इंग्लिश संघ पहिल्या डावात केवळ 196 धावाच करु शकला. त्यांच्याकडून सलामीवीर हॅरी जपनं सर्वाधिक 63 धावा केल्या. ऑस्ट्रेलियाकडून बिली मिडविंटरनं पाच बळी घेतले. अशा प्रकारे पहिल्या डावाच्या आधारे ऑस्ट्रेलियाला 49 धावांची महत्त्वपूर्ण आघाडी मिळाली. यानंतर इंग्लंडनं पलटवार करत ऑस्ट्रेलियाचा दुसरा डाव अवघ्या 104 धावांत संपुष्टात आलाय. विशेष म्हणजे ऑस्ट्रेलियाच्या सात फलंदाजांना दुहेरी आकडाही गाठता आला नव्हता. यादरम्यान इंग्लंडकडून आल्फ्रेड शॉनं पाच आणि जॉर्ज उलिएटनं तीन विकेट घेतल्या. 
 
टॉम कँडलची ऐतिहासिक कामगिरी : इंग्लंड संघाला सामना जिंकण्यासाठी 154 धावा करायच्या होत्या, मात्र ते तसं करु शकले नाही. कांगारु गोलंदाज टॉम कँडलसमोर इंग्लिश फलंदाज टिकू शकले नाहीत. त्यांचा संपूर्ण संघ 108 धावांवर कोसळला आणि त्यांना 45 धावांनी गमावावा लागला. इंग्लंडचे तीनच फलंदाज दुहेरी आकडा गाठू शकले. यष्टिरक्षक जॉन सेल्बीनं सर्वाधिक 38 धावा केल्या. तर ऑस्ट्रेलियातर्फे टॉम कँडलनं सात आणि जॉन हॉजेसनं दोन गडी बाद केले.
 
आजपर्यंत कसोटी क्रिकेटमध्ये 2535 सामने खेळले गेले आहेत. यात इंग्लंडनं सर्वाधिक कसोटी सामने (1071 सामने) खेळले आहेत. तर ऑस्ट्रेलियन संघ या बाबतीत (866 सामने) दुसऱ्या स्थानावर आहे. आतापर्यंत ऑस्ट्रेलियानं 414 तर इंग्लंडनं 392 कसोटी सामने जिंकले आहेत. सर्वाधिक कसोटी सामने खेळण्याच्या बाबतीत भारत तिसऱ्या क्रमांकावर आहे. भारतानं आतापर्यंत 579 सामने खेळले आहेत. यात भारतानं 178 कसोटी सामने जिंकले आहेत, तर तेवढ्याच सामन्यांमध्ये त्यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. याशिवाय भारतीय संघाचे 222 कसोटी सामने अनिर्णित राहिले, तर एक सामना टाय झालाय.

 क्रिकेट इतिहासातील पहिल्या कसोटी सामन्याची स्थिती :ऑस्ट्रेलियन संघ- पहिला डाव: 245 धावा आणि दुसरा डाव: 104 धावा

                                  इंग्लंड संघ- पहिला डाव : 196 धावा आणि दुसरा डाव : 108 धावा  

निकाल : ऑस्ट्रेलिया 45 धावांनी विजयी

कसोटी क्रिकेटमधील काही विक्रम - 

एका डावात सर्वाधिक धावा - श्रीलंका 952/6D (271 षटकं) विरुद्ध भारत, 2 ऑगस्ट 1997, कसोटी सामना क्रमांक 1374

एका डावात सर्वात कमी धावा - न्युझीलंड 26/10 (27 षटक) विरुद्ध इंग्लंड, 25 मार्च 1955, कसोटी सामना क्रमांक 402 

डावाच्या बाबतीत सर्वात मोठा विजय - इंग्लंड एक डाव 579 धावांनी विरुद्ध ऑस्ट्रेलिया, 20 ऑगस्ट 1938, कसोटी सामना क्रमांक 266

धावांच्या बाबतीत सर्वात मोठा विजय - इंग्लंड 675 धावांनी विरुद्ध ऑस्ट्रेलिया (लक्ष्य 742) 30 Nov 1928, कसोटी सामना क्रमांक 176

धावांच्या बाबतीत सर्वात लहान विजय -  1) वेस्ट इंडिज 1 धावेने, विरुद्ध ऑस्ट्रेलिया 23 जानेवारी 1993, कसोटी सामना क्रमांक 1210                                                                         2) न्युझीलंड 1 धावेने, विरुद्ध इंग्लंड, 24 फेब्रुवारी 2023, कसोटी सामना क्रमांक 2494


सर्वाधिक वेळ चाललेला सामना - दक्षिण आफ्रीका विरुद्ध इंग्लंड 10 दिवस चालला, सामना अनिर्णीत राहिला, सामना सुरुवात 3 मार्च 1939 रोजी झाला. कसोटी सामना क्रमांक 271

कोणत्या मैदानावर सर्वाधिक सामने - लॉर्ड्स, लंडन 1884-2023 दरम्यान 145 सामने

कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा -  सचिन तेंडूलकर (भारत) 15921 धावा, 200 सामने 329 डाव, 51 शतकं, 68 अर्धशतकं, 248* सर्वोच्च धावा 

एका डावात सर्वाधिक धावा -  ब्रायन लारा (वेस्ट इंडिज) 400* धावा 582 चेंडू, 43 चौकार, 4 षटकार विरुद्ध इंग्लंड, 10 एप्रिल 2004 

कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतकं -  सचिन तेंडूलकर (भारत) 51 शतकं

कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक द्विशतकं -  सर डॉन ब्रॅडमॅन (ऑस्ट्रेलिया) 12 द्विशतकं, 52 सामने 

पदार्पणाच्या सामन्यात सर्वाधिक धावा - गॅरी सोबर्स (वेस्ट इंडिज) 365* धावा विरुद्ध पाकिस्तान 26 फेब्रुवारी 1958 
सर्वात वेगवान शतक - ब्रेंडन मॅक्युलम (न्युझीलंड) 54 चेंडूत शतक विरुद्ध ऑस्ट्रेलिया 
सर्वाधिक बळी - मुथय्या मुरलीधरन (श्रीलंका) 800 बळी, 133 सामने, 230 डाव 
एका डावात सर्वाधिक बळी - 1) जे लेकर 10 बळी, विरुद्ध ऑस्ट्रेलिया, 26 जुलै 1956 

                                         2) अनिल कुंबळे (भारत) 10 बळी, विरुद्ध पाकिस्तान, 4 फेब्रुवारी 1999

                                         3) एजाज पटेल (न्यूझीलंड ) 10 बळी विरुद्ध भारत 3 डिसेंबर 2021 

एका सामन्यात सर्वाधिक बळी :  1)जे लेकर 19, विरुद्ध ऑस्ट्रेलिया, 26 जुलै 1956

                     2) सर्वाधिक 5 विकेट हॉल्ट - मुथय्या मुरलीधरन (श्रीलंका) 67 वेळा 

सर्वाधिक 10 विकेट हॉल्ट -  मुथय्या मुरलीधरन (श्रीलंका) 22 वेळा









Tuesday, July 4, 2023

राज्यकर्त्यांनो, कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र आमचा ?

महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासातील सर्वात मोठ्या भुकंपाला एक वर्ष पूर्ण होत नाही तोच, राज्याच्या राजकारणात दुसरा मोठा भुकंप झाला. वर्षभरापूर्वीच शिवसेनेत मोठी फूट पडल्यानंतर वर्षभरातच राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये फूट पडली. महाराष्ट्राच्या राजकीय रंगमंचावर इतकी अनागोंदी यापुर्वी कधीही माजली नव्हती.

अजित पवार यांनी साडेतीन वर्षांपूर्वी भल्या पहाटे उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली होती, तेव्हा त्यांच्याबरोबर गेलेले आमदार परत आणून शरद पवार यांनी बाजी उलटवली होती. तेव्हा अजित पवार यांना जे राजकारण जमवता आले नव्हते, ते अखेर त्यांनी 'करून दाखवलं' आहे! असंच म्हणावं लागेल. कारण रविवारी दुपारी त्यांनी पाचव्यांदा उपमुख्यमंत्रिपदाचीच शपथ घेतली ती सुद्धा छगन भुजबळ, दिलीप वळसे-पाटील, हसन मुश्रीफ यांसारख्या राष्ट्रवादीच्या बड्या आणि विशेष म्हणजे शरद पवारांच्या विश्वासू नेत्यांना तसेच काही आमदारांना सोबत घेऊन. 

मात्र, या सगळ्या राजकीय उलथापालथीमुळे एकनाथ शिंदे-देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारात आणखी एक उपमुख्यमंत्री तसेच आठ मंत्र्यांचा समावेश झाला आहे. यातच विशेष म्हणजे अजित पवार यांचा उपमुख्यमंत्री म्हणून साडेतीन वर्षांतील हा तिसरा शपथविधी. फडणवीस यांच्यासमवेत पहाटेचा शपथविधी पार पाडल्यानंतर दुसरी शपथ त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या समवेत सायंकाळी घेतली होती. आणि आता या भर दुपारी घेतलेल्या शपथेमुळे राज्याचे राजकारण पार बदलून गेले आहे. अजित पवार हे कधीही काही एक विशिष्ट विचारधारा वा तत्त्वप्रणाली यांच्या आधारे राजकारण नेते नव्हतेच. सत्तेच्या जवळ राहून जनतेच्या हिताची तसेच विकासाची कामे करण्यात त्यांना असलेला रस हा सर्वज्ञात आहे. त्यामुळेच की काय अखेर त्यांनी एकनाथ शिंदे या राज्याच्या राजकारणात त्यांच्यापेक्षा 'ज्युनिअर' असलेल्या नेत्याच्या हाताखालील उपमुख्यमंत्रिपद स्वीकारले आहे. 

मात्र, त्यांच्या या निर्णयास गेल्या दोन महिन्यांत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये घडलेल्या अनेक वादळी घटनांची पार्श्वभूमी आहे. शरद पवार यांच्या राजीनामानाट्यानंतर सुप्रिया सुळे तसेच प्रफुल्ल पटेल यांची पक्षाचे कार्याध्यक्ष म्हणून नियुक्ती झाल्यानंतर काही दिवसांतच अजित पवार यांनी पक्षाच्या रौप्यमहोत्सवी वर्षसोहळ्याच्या कार्यक्रमातच मला विरोधी पक्षनेते पदावरून मुक्त करा, असे उद्‍गार काढून प्रदेशाध्यक्षपदावर आपला डोळा असल्याचे दाखवून दिले होते. मात्र, त्यानंतर शरद पवार यांनी पुन्हा एकदा भाकरी फिरवण्याचे टाळल्यानंतर आता अजित पवार यांनी हे धाडसी पाऊल उचलले आहे आणि त्यामुळे आगामी निवडणुकांचे सारे हिशोब आणि राजकीय गणित बदलून गेले आहेत. 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पावलावर पाऊल ठेवत अजित पवार यांनी विद्यमान प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील वगळता, बाकी पक्षाच्या बहुतेक बड्या नेत्यांना भाजपच्या गोटात नेण्यात यश मिळवल्याने खऱ्या अर्थाने बळ वाढले आहे ते भाजपचेच! आगामी लोकसभा निवडणुकीत राज्यातून 40 ते 45 जागा जिंकण्याचे 'टार्गेट' भाजपच्या नेत्यांनी ठरवले आहे. परंतु केवळ एकनाथ शिंदे यांच्या 'शिवसेने'ला सोबत घेऊन भाजपला हे लक्ष्य गाठणे कठीण असल्याचे विविध सर्व्हेक्षणातून समोर आल्यामुळे फडणवीस आणखी एखाद्या मजबूत मित्राच्या शोधात होते. अत्यंत थंड डोक्याने त्यांनी हा शोध पूर्ण करताना त्यांनी आपल्या विरोधातील उद्धव ठाकरे यांच्या पाठोपाठ 'राष्ट्रवादी'चेही कंबरडे मोडले आहे. त्यामुळे सहा महिन्यांत होऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकांची रणनीतीच भाजपच्या राजकारणामागे आहे, हेही स्पष्ट झाले आहे.  

सध्या देशपातळीवरील विरोधी पक्षांच्या ऐक्याच्या प्रक्रियेस वेग येत असताना, फडणवीस यांनी पार पाडलेली ही कामगिरी भाजपच्या दिल्लीतील श्रेष्ठींसाठी भलतीच आनंददायी ठरली असणार आणि त्याची उचित 'बक्षिस' फडणवीस यांना नजिकच्या भविष्यात मिळाले तर त्यात आश्चर्य वाटायला नको. 

शिवसेनेतील बंड वा उठाव यानंतर उद्धव ठाकरे यांनी निवडणूक आयोग तसेच सर्वोच्च न्यायालयाची दारे ठोठावली होती. मात्र याउलट कायदेशीर तसेच तांत्रिक बाबींपेक्षा लोकांमध्ये जाऊनच लढाई लढणार असल्याचे शरद पवार यांनी स्पष्ट केले आहे. या बंडामागे 'राष्ट्रवादी'च्या दुसऱ्या फळीतील नेतृत्वाचे व्यवस्थापन करण्यात आलेले त्यांचे अपयशही कारणीभूत आहे, असे म्हणता येईल. राज्याच्या राजकारणाचे भीष्म पितामह समजले जाणाऱ्या शरद पवार यांनी अनेक बंडे पचवली आहेत; परंतु घरातूनच झालेले बंड ते कसे हाताळतात, हे पुढच्या राजकारणाच्या दृष्टीने महत्त्वाचे ठरणार आहे. 

तोच दुसरीकडे अजित पवार आणि त्यांच्या सहकाऱ्यांना मंत्रिमंडळात सामावून घेतल्यामुळे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. ज्या नेत्यांवर भाजप घणाघाती आरोप भाजप करत होता, तेच आता फडणवीस यांच्या मांडीला मांडी लावून मंत्रिमंडळाच्या बैठकीत बसणार आहेत. सर्वसामान्य भाजप कार्यकर्त्यांना हे पचणे अवघड आहे. मुख्यमंत्री शिंदे सातत्याने आपले सरकार हे हिंदुत्ववादी सरकार आहे आणि बाळासाहेब ठाकरे यांचा विचार घेऊन पुढे जाणारे सरकार आहे, असे सांगत आले आहेत. यामुळे आता एकनाथ शिंदे यांच्या गटातील आमदारांनी काहीप्रमाणात नाराजी वर्तवली आहे. भविष्यात त्यांची ना घर का ना घाट का अशी स्थिती होण्याची भिती त्यांना वाटत असावी. 

रविवारच्या या बुलेट ट्रेन पेक्षाही वेगवान राजकीय घडामोडींमुळे महाराष्ट्रातील राजकीय समीकरणेच बदलून गेली आहेत. राज्यातील राजकारण या थराला कधीही गेले नव्हते. त्यामुळेच राज्यकर्त्यांनो, कुठं नेऊन ठेवलाय महाराष्ट्र आमचा? असाच प्रश्न आज राज्यातील जनता या सर्वपक्षीय नेत्यांना विचारत असावी.

- नवनीत कुमार तापडिया 

Wednesday, July 20, 2022

नामांतर झाले पण आता पुढे काय?

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाता जाता औरंगाबादचे 'संभाजीनगर' आणि उस्मानाबादचे 'धाराशिव' असे नामकरण केले. यानंतर सत्तेत आलेल्या शिंदे-फडणवीस सरकारने औरंगाबादचे 'छत्रपती संभाजीनगर' आणि उस्मानाबादचे 'धाराशिव' नामकरणाचा प्रस्ताव पुन्हा एकदा मंजूर केला यामुळे गेली कित्येक वर्षे प्रलंबित असलेल्या औरंगाबादच्या नामांतराचा प्रश्न एकदाचा सुटला असे म्हणले तर वावगे ठरणार नाही, याचा आनंद असला तरी ज्या मुद्द्यावरून गेली अनेक वर्षे राजकारण्यांनी आपली पोळी भाजली एकदाचा तो मुद्दा बाजूला गेला, याचाही आनंद सर्वसामान्य नागरिकांना झाला असावा.‌ एकदाचे नामांतर झाले पण आता पुढे काय असा प्रश्न अनेकांच्या मनात उपस्थित होत आहे. कारण औरंगाबाद शहराचे गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेले मूलभूत प्रश्न नामांतर झाल्यावरही प्रलंबितच राहतील. मग नामांतर करून नेमके साध्य झाले तरी काय ? असाही प्रश्न अनेकांच्या मनात उपस्थित होत असेल.‌ जशी एखाद्या माणसाची ओळख आपल्या नावाने नाही तर आपल्या कर्तुत्वाने होते. तशीच एखाद्या शहराची ओळख ही त्याच्या नावाने नव्हे तर त्या ठिकाणी असणाऱ्या सोयी सुविधांनी निर्माण होते असे माझे वैयक्तिक मत आहे. आता एकदाचे नामकरण झाले, किमान आता तरी सर्व राजकीय नेते, पुढारी या विषयाला बाजूला ठेवून विकासाकडे लक्ष देतील का असा सवाल उपस्थित होत आहे. 

औरंगाबाद शहराचे नामकरण 'छत्रपती संभाजीनगर' असे करून अस्मितेचे व भावनेचे राजकारण करू पाहणारे सेना व भाजप, तसेच या नामांतराला विरोध करण्यासाठी हजारोंच्या संख्येने मोर्चे काढून आपले शक्ती प्रदर्शन करणारे एमआयएम सारखे पक्ष यांच्या प्रवृत्ती सारख्याच आहेत. मूलभूत प्रश्नांकडे दुर्लक्ष करून भावनिक मुद्दे उकळून काढून आपली व्होट बँक मजबूत करणे हेच सध्या सुरू आहे. दुर्दैवाने वर्तमानापेक्षा इतिहासात रमणे अधिक पसंत करणारा आपला 'इतिहासजीवी' समाज अशा प्रकारच्या राजकारणाला सहज बळी पडतो व मूलभूत प्रश्नांकडे सोयीस्कर दुर्लक्ष करतो. यामुळे समाजाचीच हानी होते ही साधी गोष्ट देखील नागरिकांच्या मनात येत नाही. जागतिक वारसा लाभलेला जिल्हा तसेच राज्याची पर्यटन राजधानी अशी ख्याती मिळवलेल्या औरंगाबाद शहरात आजही अनेक मूलभूत समस्या गेल्या कित्येक वर्षांपासून प्रलंबित आहेत. हाकेच्या अंतरावर जायकवाडी धरण असतानाही स्थानिक प्रशासन लोकप्रतिनिधी शहरातील नागरिकांना दररोज पिण्याचे पाणी पुरवू शकले नाही. जिल्ह्यातील ग्रामीण भागांतील रस्त्यांची अवस्था आजही बिकटच आहे. औरंगाबाद जिल्हा आजही शैक्षणिक दृष्ट्या मागासलेलाच आहे शहरात अथवा जिल्ह्यात एकही राष्ट्रीय दर्जाची शैक्षणिक संस्था नाही. आयआयएम सारखी व्यवस्थापन क्षेत्रातील महत्त्वाची संस्था औरंगाबाद शहरासाठी मंजूर होऊन केवळ लोकप्रतिनिधींच्या उदासीनतेमुळे तत्कालीन युती सरकारच्या काळात नागपूरला पळवली गेली. अलीकडच्या काळातही क्रीडा विद्यापीठ मंजूर झाले होते. परंतु, आपल्याला सुविधांपेक्षा नामांतराचा रस असल्याचे येथील लोकप्रतिनिधींनी दाखवून दिले आणि त्याचाच परिणाम म्हणजे ते क्रीडा विद्यापीठही पुण्याला पळवण्यात आले. केंद्रातील मोदी सरकारच्या महत्त्वकांक्षी स्मार्ट सिटी प्रकल्पात औरंगाबाद शहराचा समावेश असला तरी येथील प्रशासन मात्र अद्यापही स्मार्ट झालेले दिसत नाही. जेणेकरून शहराला स्मार्ट म्हणावे असे एकही काम शहरात झालेले दिसत नाही. स्मार्ट सिटी प्रकल्पाअंतर्गत मनपा प्रशासनाने तीन वर्षांपूर्वी शंभर स्मार्ट बस खरेदी तर केल्या परंतु, अद्यापही त्या सर्व शंभर बस रस्त्यावर कशा चालव्यात याचे नियोजन तीन वर्षात करणे प्रशासनाला जमलेले नाही. याचा परिणाम म्हणून बहुतांश स्मार्ट बस मुकुंदवाडी आगारात धुळखात उभे आहेत. यासारख्या अनेक मूलभूत समस्या शहर व जिल्ह्यात प्रलंबित असताना सरकार मात्र नामांतरासारख्या भावनिक राजकारणात व्यस्त आहे आणि दुर्दैव म्हणजे बहुसंख्या नागरिकही या राजकीय प्रयोगाचा एक भाग होण्यात आपल्याला धन्य मानत आहेत. शहराचे नामांतर झाले म्हणून रस्त्यावर उतरून आनंदोत्सव साजरा करणारे आणि नामांतराच्या विरोधात मोर्चे काढून निषेध करणारे मात्र गेल्या अनेक वर्षात प्रलंबित असलेल्या पाणीप्रश्न तसेच इतर समस्यांविरोधात कधीच रस्त्यावर उतरले नाहीत. या सर्व मंडळींनी शहराचे नामांतर झाले पण आता पुढे काय ? या प्रश्नाचे उत्तर शोधायला हवे... 

Wednesday, July 13, 2022

जसप्रीत बुमराह की गेंदबाजी के सामने इंग्लैंड की बल्लेबाज हुए ढेर


भारतीय टीम ने इंग्लैंड के खिलाफ वनडे सीरीज में जीत के साथ आगाज किया है। पहले एकदिवसीय मैच में भारतीय टीम ने इंग्लैंड को 10 विकेट से हराते हुए तीन मैचों की सीरीज में 1-0 से बढ़त हासिल कर ली। पहले खेलते हुए इंग्लैंड की टीम 25.2 ओवर में 110 रन पर आउट हो गई। जवाब में खेलते हुए भारत ने 18.4 ओवर में बिना विकेट गंवाए 114 रन बनाकर मैच अपने नाम कर लिया। 

टॉस हारकर पहले खेलते हुए इंग्लैंड की शुरुआत बेहद खराब रही। ओपनर बल्लेबाज जेसन रॉय बिना खाता खोले आउट हो गए। उनको बुमराह ने पवेलियन भेज दिया। इसके बाद जो रूट और बेन स्टोक्स भी खाता नहीं खोल पाए। दोनों को बुमराह और शमी ने आउट किया। बुमराह यहीं नहीं रुके और बेयरस्टो के अलावा लिविंगस्टोन को भी आउट कर दिया। बेयरस्टो ने 7 रन बनाए। लिविंगस्टोन खाता नहीं खोल पाए। जोस बटलर कुछ देर टिके लेकिन वह भी 30 रन बनाकर शमी का शिकार हो गए। बुमराह ने अपना पांचवां शिकार ब्रेडन कार्स को बनाया। वह 15 रन बनाकर आउट हुए, अंतिम विकेट के रूप में डेविड विली आउट हुए, उनको 21 रन पर बुमराह ने आउट किया। इस तरह इंग्लिश टीम 25.2 ओवर में 110 रन बनाकर आउट हो गई। बुमराह ने 19 रन देकर 6 विकेट झटके। शमी ने 3 और प्रसिद्ध कृष्णा ने 1 विकेट झटका।जवाब में खेलते हुए भारतीय ओपनर रोहित शर्मा और शिखर धवन ने धाकड़ बैटिंग की। दोनों ने इंग्लैंड के गेंदबाजों का सहजता से सामना किया। रोहित शर्मा आक्रामक मूड में दिखाई दिए। उन्होंने नियमित अंतराल पर गेंदों को सीमा रेखा से बाहर भेजा और अपना 45वां वनडे अर्धशतक पूरा किया। वह 58 गेंदों में 6 चौकों और 5 छक्कों के साथ 76 रन बनाकर नाबाद रहे। धवन 31 रन बनाकर नाबाद रहे। भारत ने 18.4 ओवर में बिना विकेट गंवाए 114 रन बनाकर मैच जीत लिया।

पहले एकदिवसीय मुकाबलेमे बांगलादेशने वेस्ट इंडिज को हराया

पहले एकदिवसीय मुकाबलेमे बांगलादेशने वेस्ट इंडिज को हराया

बांग्लादेश ने गुयाना में खेले गए पहले वनडे मुकाबले में वेस्टइंडीज को 6 विकेट से हरा दिया। बारिश की वजह से मुकाबला 41-41 ओवरों का हुआ। पहले बल्लेबाजी करते हुए वेस्टइंडीज की टीम 9 विकेट खोकर सिर्फ 149 रन ही बना पाई। जवाब में बांग्लादेश ने इस टार्गेट को केवल 4 विकेट खोकर 31.5 ओवर में ही हासिल कर लिया और सीरीज में 1-0 की बढ़त बना ली है। 

बांग्लादेश के कप्तान तमीम इकबाल ने टॉस जीतकर गेंदबाजी करने का फैसला किया जो बिल्कुल सही साबित हुआ। पहले बैटिंग करने उतरी वेस्टइंडीज की शुरूआत अच्छी नहीं रही। महज 1 रन के स्कोर पर ही शाई होप के रूप में उन्हें बड़ा झटका लग गया। वो अपना खाता भी नहीं खोल पाए। 
इसके बाद काइले मेयर्स 10 और ब्रेंडन किंग 8 रन बनाकर आउट हो गए। वहीं कप्तान निकोलस पूरन भी बड़ी पारी नहीं खेल पाए 18 रन बनाकर चलते बने। टॉप ऑर्डर में शामराह ब्रूक्स ने 66 गेंद पर 33 रन बनाए। इसके अलावा निचले क्रम में एंडरसन फिलिप्स ने नाबाद 21 और जायडन सील्स ने नाबाद 16 रन बनाकर टीम को लड़ने लायक स्कोर तक पहुंचाया। बांग्लादेश के लिए शोरीफुल इस्लाम ने 4 और मेहदी हसन ने 3 विकेट लिए।टार्गेट का पीछा करने उतरी बांग्लादेश की शुरूआत भी अच्छी नहीं रही और सलामी बल्लेबाज लिटन दास केवल 1 रन बनाकर आउट हो गए। इसके बाद कप्तान तमीम इकबाल और नजमुल हुसैन शंटो के बीच 40 रनों की साझेदारी हुई। तमीम ने 33 और नजमुल ने 37 रन बनाए। इसके बाद महमदुल्लाह ने 69 गेंद पर नाबाद 41 रन बनाकर टीम को जीत दिला दी। नूरुल हसन ने भी नाबाद 20 रन बनाए।

Thursday, February 24, 2022

शिक्षण आणि शिक्षणसंस्थांना आलेले अपयश!


आपल्या देशात राजकारणासाठी अनेक मुद्दे असताना अलिकडे शिक्षण हाही राजकारणाचा विषय बनत आहे. हिजाबवरून कर्नाटकात शाळा महाविद्यालय बंद करण्याचा निर्णय घ्यावा लागला. महाराष्ट्रातही त्याचे काही प्रमाणात पडसाद उमटले. उच्च न्यायालयानेदेखील विद्यार्थ्यांनी अभ्यासाकडे लक्ष द्यावे असेही सुनावले. या संदर्भाने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली. त्याचवेळी देशात अभिव्यक्ती स्वातंत्र्याबरोबर आचार, विचार स्वातंत्र्याचा मुद्दादेखील चर्चेसाठी समोर आला. शिक्षणात धार्मिकतेचा विचार नको. सर्वांसाठी गणवेश सक्तीचे असावा, असे बरेच मुद्दे समोर आले. एकाचवेळी दोन धर्मांचे विद्यार्थी समोरासमोर आल्यानंतर काय घडते याचा कटू अनुभव देशाला पहावा लागला. ज्या वयात विवेकाची पेरणी करत विश्व समजावून घ्यायचे त्या वयात धर्माची पाऊलवाट चालणे पसंत करणे हे अनाकलनीय आहे.

खरेतर राज्यघटनेने आचार, विचार स्वातंत्र्य दिल्यानंतर त्याप्रमाणे जगण्याचे अधिकार प्रत्येक धर्माच्या आणि जातीच्या नागरिकाला दिले आहेत. प्रत्येक व्यक्तीला आपल्या धर्माचरणाप्रमाणे वर्तन करण्याचा, पंरपरा जोपासण्याचे स्वातंत्र्य राज्यघटनेने प्रत्येक धर्मीयांना दिले आहे. जे राज्यघटनेने दिले आहे ते त्यांना उपभोगण्यासाठीचे स्वातंत्र्य देण्यास काय हरकत आहे? कोणी कोणाच्या खासगी जीवनात कोणत्याही परिस्थितीत हस्तक्षेप करू नये हे खरेच, पण आपले अधिकार उपभोगत असताना त्याचा परिणाम इतरांच्या जीवनावर होता कामा नये याची काळजीदेखील घेण्याची गरज असते. शिक्षणातून साक्षरतेचा आलेख उंचावत असताना देशात अशा अत्यंत छोट्या छोट्या गोष्टी मोठ्या होऊ लागतात तेव्हा हा विवेकी दृष्टीचा अभाव आहे हे निश्चित. शिक्षणातून विचार करण्यास प्रवृत्त करणारी पाऊलवाट आणि विवेकी वाट चालणारी दृष्टी देण्यास कमी पडलो हेच या निमित्ताने समोर आले आहे. त्यामुळे कोणी काय म्हटले आहे ते योग्य की अयोग्य याचा विचार करण्याची क्षमता किमान शिक्षणातून यायला हवी. तेच शिक्षणाचे उद्दिष्ट आहे. ते झाले नाही तर अशा घटना हळूहळू मोठे स्वरूप प्राप्त करणारच. त्यातून समाजाच्या विकासाची प्रक्रिया गतीहीन होण्याची शक्यता अधिक आहे.

देशात शिक्षणाचा आलेख उंचावत असताना अशी एखादी घटना भोवतालात घडावी. त्या घटनेकडे विचाराने न पहाता ती घटना देशभर पसरवली जावी, आंदोलन उभे राहावे हे अनाकलनीय आहे. शिक्षणाने चांगले, वाईट या संदर्भाने विचार करण्याची शक्ती मस्तकात भरायची असते. ती भरण्यात आपण कमी पडलो आहोत. शिक्षणातून ज्ञान लादले जात आहे, पण विचार करण्यासाठी लागणारी प्रक्रिया होताना दिसत नाही. कोणतीही घटना चांगली वाईट हे आपल्या पंरपरा, पूर्वग्रहावर न ठरविता ती विवेकाने निश्चित करता यायला हवी. आपण कोणत्याही धर्मातील असलो तरी विचार मात्र विचार करता यायला हवा.

 समाजात जे जे वाईट आणि विकृत आहे ते दूर करणे हेच शिक्षणाचे काम आहे. विचाराची पेरणी शिक्षणातून केली गेली तर समाजात संधी साधून दुफळी माजविणार्‍या कोणालाही मोठे होता येणार नाही. कोणीतरी अल्पशिक्षित माणूस आवाहन करतो आणि ते अविवेकाचे, समाज, राष्ट्र आणि विद्यार्थ्यांचे अहित करणारे आहे की, हित साधणारे आहे याचा विचार न करता गर्दी उभी राहते. आंदोलनासाठी रस्त्यावर विद्यार्थी येतात तेव्हा तो शिक्षणाचा पराभव म्हणून स्वीकारण्याची गरज आहे. शिक्षण म्हणजे पाठ्यपुस्तकातील आशय शिकवून मार्क्स मिळविण्यासाठी विद्यार्थ्यांना तयार करणे एवढेच नाही.

आपण जे शिकतो आहोत त्याचा संदर्भ जगण्याशी जोडणे आहे. त्या आशयाला जीवनाच्या प्रगतीच्या दिशेने जोडणे गरजेचे असते. आज शिक्षणात जे काही शिकतो आहोत. त्याचा संबंध जीवनाशी नाते सांगत नाही. केवळ परीक्षेपुरते शिकणे होत असल्याने आणि शिक्षक, पालक यांनाही माणूस घडविण्यापेक्षा मार्कांचा आलेख उंचावण्यासाठी ज्या शाळा प्रयत्न करतात त्याच अधिक स्मार्ट वाटू लागल्या आहेत. त्यामुळे समाजात अशा घटना घडल्यानंतर त्याकडे दुर्लक्ष करण्याऐवजी त्याला प्रतिसाद मिळत जातो. त्यातून समाज, राष्ट्राचे आपल्या वर्तनाने काही अहित घडते का? याचा विचारही गमावला जात आहे, असे अनेक घटनांतून वारंवार समोर येत आहे. समाजाचे जेव्हा विवेक, विचार आणि शहापणापासून दुरावणे होते तेव्हा भावनाचा खेळ सुरू होतो. विवेक हटला की विकार समाजमनावर अधिराज्य करत जातो. अशी दूरवस्था निर्माण झाली की समाजाच्या संवेदना बोथट होतात. समाज असंवेदनशील बनणार असेल तर त्यातून राष्ट्र व समाजाला धोका निर्माण होतो. समाजात ज्या शिक्षणाने विचार पेरायचे ते शिक्षणही मग अविवेकाची वाट चालू लागते. तेथे विचाराची पेरणी होण्याचे थांबते.

जिथे जिथे विचार, शहाणपण असते तेथे धर्माच्या भिंतीपेक्षा माणूसपण अधिक महत्वाचे वाटते. मग माणुसकीसाठी आपण कोणत्या धर्माचे आहोत हे लक्षात घेण्याची गरज पडत नाही. जगातील कोणताही धर्म हा माणसात द्वेष, मत्सर, राग, अंहकार निर्माण करण्याची भूमिका घेत नाही. संत ज्ञानेश्वरांनीदेखील म्हटले आहे की, संत तिथे विवेक असणे केजी. तो विवेक पेरला गेला होता. महाराष्ट्रातील मातृहृदयी लेखक साने गुरूजी यांनी धर्माचा विचार सांगताना म्हटले होते की, खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे, हा भाव आपण शाळा-महाविद्यालयात रूजविण्याची गरज वर्तमानात अधिक अधोरेखित करताना दिसत आहे. सामान्य माणसांच्या जीवनात धर्माचा फारसा प्रभाव नसतो. कोरोनाच्या काळात अनेक मुस्लीम धर्मीय लोकांनी हिंदू लोकांवर अंत्यसंस्कार केल्याची उदाहरणे माध्यमातून पुढे आले होती. हिंदूनी मुस्लिमांसाठी मदतीचा हात दिला.

आज ग्रामीण भागात हिंदू आणि मुस्लीम समाजाची कुटुंबे एकत्र राहतात. त्यांच्यात होणारी देवाणघेवाण त्यांच्यातील बंधूभाव दाखवतो. मात्र सध्या हिजाब परिधान करण्यावरून जो संघर्ष सुरू आहे, असे काही समोर आले की मग मने अधिक धार्मिक आणि कट्टर होण्याचा धोका निर्माण होतो. ही कटूता आणि कट्टरता व्यापक समाजहित आणि देशाच्या प्रगतीसाठी मारक असते. त्यामुळे शिक्षणातून धर्मनिरपेक्षतेचा विचार पुढे घेऊन जाण्याची जबाबदारी शिक्षण व्यवस्थेने पेलण्याची निंतात गरज आहे. ती धर्मनिरपेक्षता म्हणजे जगातील सर्वधर्माचा सन्मान करणे आहे. आपलाच धर्म खरा असे नाही हेही लक्षात घ्यायला हवे. स्वामी विवेकानंद 1893 ला शिकागोच्या परिषदेत माझ्या बंधू आणि भगिनींनो, असे म्हणत धर्माचा खरा विचार पेरला होता. तो वर्तमानात पेलला गेला नाही तर समाजव्यवस्था घनदाट अंधाराच्या खाईत लोटली जाण्याची शक्यता आहे.

आपला देश धर्मनिरपेक्ष आहे. शाळा महाविद्यालयात ज्ञानापेक्षा धर्म मोठा ठरू नये. धर्म ही प्रत्येकाची खासगी गोष्ट आहे. त्यामुळे सार्वजनिक जीवनात त्याचे दर्शन आणि प्रदर्शन घडू नये. सार्वजनिक जीवनात आपण केवळ भारतीय असायला हवे. धर्मनिरपेक्षता म्हणजे प्रत्येकाने एकमेकाच्या धर्माचा आदर करणे असते. धर्माच्या आधारे एकमेकांवर हल्ले करणे नाही. 

✒️ नवनीत कुमार तापडिया

Sunday, July 5, 2020

राज्यात 'अनलॉक की लॉकडाऊन' ?



संपूर्ण भारतासह महाराष्ट्रात लॉकडाऊन लागु करुन आज शंभराहून अधिक दिवस उलटुन गेलेत. सुरुवातीला लॉकडाऊन हे चार ते पाच आठवड्यांपुरते असेल असा लोकांचा समज होता, मात्र लॉकडाऊन काळात आवश्यक कोरोना चाचण्या न झाल्याने कोरोना बाधीतांची संख्या कमी होती परंतु आता दिवसेंदिवस कोरोना चाचण्यांची संख्या वाढत असल्याने बाधीतांची संख्या देखील वाढत आहे. कोरोना विषाणूची साखळी तोडण्यासाठी लॉकडाऊन लागु करत असल्याचे सरकारकडून सांगण्यात आले. परंतु आज शंभराहून अधिक दिवस उलटुन गेल्यावर देखील आपण साखळी तोडण्यास अपयशी ठरलो असल्याचे दिसत आहे. उशिरा लॉकडाऊन लागु करण्याची मोठी किंमत अन्य देशांना चुकवावी लागली. भारतात तसे होऊ नये म्हणुन सरकारने लवकर लॉकडाऊन लागु करत त्याचे निर्बंध देखील इतर देशांच्या तुलनेत कडक ठेवण्यात आले. पहिल्या महिन्यातच कोरोना संसर्गाची साखळी तोंडुन जगात विक्रम स्थापित करण्याचे मनसुबे केंद्र सरकारचे होते मात्र ते सफल झालेले दिसत नाही.

नागरिकांचे जीव वाचविण्यास कोणतेही सरकार प्राधान्य देते त्यानुसार लॉकडाऊन समर्थनीय ठरतो. परंतु लॉकडाऊन लागु करुन शंभराहून अधिक दिवस उलटुन गेल्याने राज्याच्या अर्थव्यवस्थेचा गाडा देखील चालु करणे आवश्यक झाले होते. हे लक्षात घेऊन जुन च्या मध्यानंतर राज्यात मिशन बिगन अगेन म्हणजेच अनलॉक ची प्रक्रिया सुरू झाली. लॉकडाऊन हा शब्दच हद्दपार करायचा आहे, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे वारंवार सांगत असले तरी यावरून सरकारमध्ये मतभेद आहेत.

मिशन बिगिन अगेनची घोषणा करत लॉकडाऊन उठवला जातो पण चार दोन दिवसांनी एक दोन कोरोना बाधीतांची वाढ झाली की त्या त्या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी तिथे संचारबंदी लागू करत आहेत. आधी शहरात बंदीचा निर्णय घेतला जातो, पण तो अचानक संपूर्ण जिल्ह्यासाठी केला जातो. महाराष्ट्रात आंतरजिल्हा प्रवास बंदी उठत नाही, त्यामुळे राज्यातील माणुस आपल्या घरीच अडकुन पडलाय. मात्र थोड्या प्रमाणात का होईना रेल्वे चालु असल्याने परराज्यातील परप्रांतीय त्यांच्या मुळ गावी जाऊन महिनाभर आराम करून परत मुंबई पुण्यात कामाला येत आहेत परंतु भुमिपुत्रांना रोजगार देण्याची सरकारने केलेली घोषणा हवेतच विरली असल्याचे दिसत आहे. अर्थचक्र बंद पडले आहे ते उघडायचे आहे, पण राज्यातील वाहतूक व्यवस्था चालु करायला राज्य सरकार तयार नाही. एकीकडे कंपन्या आपल्या कर्मचाऱ्यांना कामावर बोलवत आहेत परंतु राज्यात वाहतूक व्यवस्था चालु नसल्याने हे कामगार कामावर जाण्यास असमर्थ आहेत. काही कामगार आपली स्वत: ची गाडी घेऊन जात असले की त्यांच्या गाड्या जप्त केल्या जात आहेत. मग लोक कामावर कसे जाणार ? परिणामी यामुळे त्यांच्यावर नोकरी जाण्याची टांगती तलवार आहे. एकीकडे राज्यातील कामगार देशोधडीला लागले असले तरी सरकार सांगत आहे संयम ठेवा. रोम जळत असताना निरो फिडल वाजवत होता तसा हा प्रकार आहे.

राज्यातील व्यवहार टप्याटप्याने सुरु करता यावेत यासाठी राज्य सरकारने मिशन बिगिन अगेन सुरू केले पण आता या मिशन चा पुरता फज्जा उडाला आहे. कोरोनावर प्रतिबंध करण्यासाठी लॉकडाऊन हाच पर्याय असु शकत नाही. आता शंभर दिवस उलटल्यानंतर सरकारने हळुहळु सर्व सुरू करणे आवश्यक आहे. एकीकडे राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले की आता राज्यात लॉकडाऊन नाही फक्त अनलॉक अन् लगेच दुसरीकडे सरकारने राज्यात लॉकडाऊनची मुदत 31 जुलै पर्यंत वाढविण्याचे जाहीर केले. यावरुन राज्य सरकारमध्ये समन्वय नसल्याचे दिसून येत आहे. मुंबई मध्ये दोन किलोमीटर परिघाबाहेर न फिरण्याचा गोंधळ तर ठाण्यात पालकमंत्र्यांना विश्वासात न घेता ठाणे जिल्ह्यातील महानगरपालिकांमध्ये आयुक्त बदलण्यात आले. परभणी आणि बीड जिल्ह्यात चार पाच रुग्ण वाढले की तेथील जिल्हाधिकाऱ्यांनी चार पाच दिवसांचे लॉकडाऊन लागु केले. मात्र औरंगाबाद जिल्ह्यात कोरोना बाधीतांची संख्या सात हजारांच्या उंबरठ्यावर असताना तिथे लॉकडाऊन नाही. अशीच परिस्थिती राज्यातील बहुतांश जिल्ह्यात आहे. जालना, जळगाव, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक या जिल्ह्यात देखील स्थानिक जिल्हाधिकाऱ्यांनी लॉकडाऊन लागु केले आहे आणि राज्य सरकार मात्र अनलॉक ची भाषा करत आहे. या जिल्हाधिकाऱ्यांना माझा एकच प्रश्न जर शंभर दिवसात कोरोना संसर्गाची साखळी तुटत नसेल तर या चार, सहा दिवसांच्या संचारबंदीने काय होणार आहे ? यामुळे कोरोना पळुन जाणार आहे का ? जिल्हाधिकारी राज्यकर्ते झालेत आणि मंत्री, पालकमंत्री आमदारांना कोणी विचारत नाही. जर असे लॉकडाऊन - लॉकडाऊन खेळायचे होते तर 'मिशन बिगीन अगेन'च्या ऐवजी 'मिशन लॉकडाऊन अगेन' अशी घोषणा मुख्यमंत्र्यांनी करायला हवी होती. यावरुन एक प्रकारे महाराष्ट्रात 'प्रशासकीय राजवट' लागु आहे असे दिसत आहे.

सरकार आणि प्रशासनाच्या या गोंधळात आज गोरगरीब रस्त्यावर आला आहे. लोक जगण्यासाठी बाहेर पडत आहेत, पण रोजगार कधीही हिरावून घेतला जाईल अशी भिती आहे. राज्यातल्या निम्म्यापेक्षा अधिक लोकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत, ज्यांच्या आहेत त्यांचे पगार निम्म्यावर आहेत. एकीकडे सरकार म्हणते कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना पुर्ण पगार द्यावा अन् दुसरीकडे सरकारला सरकारी कर्मचाऱ्यांना पगार द्यायला पैसे नाहीत परंतु मंत्र्यांना कोट्यावधी रुपयांची वाहने घेण्यासाठी आहेत. पण जर असे लॉकडाऊन चालुच राहिले तर कंपन्यांकडे सुद्धा पैसे कुठून येतील याचा विचार सरकारने करावा. अशा संकटकाळात सरकार व प्रशासनाने सोबत विचार विनिमय करून एखादा निर्णय घेणे अपेक्षित असते परंतु राज्यात सरकार आपल्याच सरकार मधील रुसवे फुगवे दुर करण्यात व्यस्त आहे आणि प्रशासन मात्र सरकार चालवत आहे असे चित्र राज्यात दिसत आहे. एकीकडे सरकार अथवा सरकारमधील मंत्री म्हणतात राज्यात आता अनलॉक ची प्रक्रिया सुरू झाली आहे आणि दुसरीकडे लगेच स्थानिक जिल्हाधिकारी संचारबंदी लागू करतात यावरून राज्यात नेमकं अनलॉक आहे की लॉकडाऊन हा प्रश्र्न राज्यातील जनतेच्या मनात आहे. 

✒️  नवनित कुमार तापडिया

147 वर्षांचं झालं कसोटी क्रिकेट...

Happy Birthday Test Cricket: 15 मार्च हा दिवस क्रिकेटच्या इतिहासात खूप खास आहे. 147 वर्षांपूर्वी म्हणजेच 1877 मध्ये आजच्याच दिवशी कसोटी क्र...